
चालू घडामोडी | लाल बहादूर शास्त्री पुण्यतिथी

लाल बहादूर शास्त्री पुण्यतिथी
Death Anniversary of Lal Bahadur Shastri
भारताचे दुसरे पंतप्रधान श्री लाल बहादूर शास्त्री यांना पुण्यतिथी निमित्त मानवंदना 💐💐🙏
Subject : GS - आधुनिक भारताचा इतिहास
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) ताश्कंद शांतता करारावर स्वाक्षरी खालील पैकी कोणत्या भारतीय पंतप्रधानांनी केली होती ?
1. पंडित जवाहरलाल नेहरू
2. लाल बहादूर शास्त्री
3. राजीव गांधी
4. अटलबिहारी वाजपेयी
उत्तर : लाल बहादूर शास्त्री
श्री लाल बहादूर शास्त्री
• जन्म : जन्म 2 ऑक्टोबर 1904 रोजी उत्तर प्रदेशातील मुघलसराय येथे झाला.
• लाल बहादूर शास्त्री यांनी वाराणसीतील काशी विद्यापीठात शिक्षण घेतले. येथे त्यांना विद्या पीठाने " शास्त्री " ही पदवी बहाल केली.
• लाल बहादूर शास्त्री हे गांधीजींच्या राजकीय विचारसरणी ने प्रभावित होते.
• भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातील ते एक महत्वपूर्ण सेनानी होते.
• असहकार आंदोलनात, सविनय कायदेभंग चळवळ, भारत छोडो आंदोलनात सहभागी झाल्याने त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला.
भारताचे पंतप्रधान
• श्री लाल बहादूर शास्त्री पंडित जवाहरलाल नेहरू नंतर भारताचे दुसरे पंतप्रधान बनले.
• 9 जून 1964 ते 11 जानेवारी 1966 पर्यंत त्यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून काम केले.
• पंतप्रधान म्हणून काम करत असताना दोन महत्त्वपूर्ण घटना घडल्या.
• 1965 चे भारत - पाकिस्तान युद्ध. या युद्धा दरम्यान त्यांनी जय जवान जय किसान ही घोषणा दिली.
• कृषीप्रधान देश असूनही त्याकाळात देशात अन्नधान्याचा खूप तुटवडा होता.
• PL ४८० करारानुसार भारताला अमेरिकेकडून गहू आयात करावा लागत.
• 1965 च्या भारत - पाकिस्तान युद्धामुळे अन्नधान्याच तुटवडा अजूनच वाढला.
• लाल बहादूर शास्त्री यांनी याच काळात हरितक्रांती ची सुरुवात केली.
• त्यांनी 1965 मध्ये भारतीय अन्न महामंडळ (Food Corporation of India -FCI) ची स्थापना केली.
• भारताला दूध उत्पादनात स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांनी श्वेतक्रांतीतही मोलाची भूमिका बजावली.

मृत्यू :
• लाल बहादूर शास्त्री यांचे 10 जानेवारी 1966 रोजी ताश्कंद शहरात शांतता करारावर स्वाक्षरी केल्यानंतर काही तासांत त्यांचे निधन झाले.
• हे भारताचे पहिले असे पंतप्रधान होते की त्यांचे निधन भारताच्या बाहेर झाले.

समाधीस्थळ
नवी दिल्ली येथे विजयघाट नावाने लाल बहादूर शास्त्री यांचे समाधीस्थळ आहे.
भारतरत्न पुरस्कार
• त्यांना 1966 मध्ये मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरविण्यात आले.
• मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळवणारे ते पहिले व्यक्ती होते.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन स्टडी पॉईंट्स :
• लाल बहादूर शास्त्री : भारताचे दुसरे पंतप्रधान
• पंतप्रधान कालावधी : 9 जून 1964 ते 11 जानेवारी 1966
• प्रसिद्ध घोषणा : “जय जवान, जय किसान” – 1965 च्या भारत–पाकिस्तान युद्धाच्या काळात
• ताश्कंद शांतता करार : 10 जानेवारी 1966 रोजी स्वाक्षरी
• निधन : 11 जानेवारी 1966, ताश्कंद (भारताबाहेर निधन झालेले पहिले पंतप्रधान)
• समाधीस्थळ : विजयघाट, नवी दिल्ली
• भारतरत्न : 1966 मध्ये मरणोत्तर; मरणोत्तर भारतरत्न मिळवणारे पहिले व्यक्ती


