
चालू घडामोडी | राष्ट्रपती भवनात नवा पुतळा कोणाचा ?
Whose Statue Now at Rashtrapati Bhavan?
Subject : GS
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलिकडेच, राष्ट्रपती भवनातील ब्रिटिश वास्तुविशारद एडविन ल्युटियन्स (Edwin Lutyens) यांचा पुतळा हटवून त्या जागी कोणाचा पुतळा बसवण्यात आला ?
1. महात्मा गांधी
2. डॉ. राजेंद्र प्रसाद
3. चक्रवर्ती राजगोपालाचारी
4. अटलबिहारी वाजपेयी
उत्तर : चक्रवर्ती राजगोपालाचारी
बातमी काय ?
• सी. राजगोपालाचारी यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आले.

🏛️ राष्ट्रपती भवनातील या नविन पुतळ्या बद्दल परीक्षेसाठी IMP माहिती :
• राष्ट्रपती भवनातील ब्रिटिश वास्तुविशारद एडविन ल्युटियन्स (Edwin Lutyens) यांचा पुतळा हटवून त्या जागी स्वतंत्र भारताचे पहिले आणि एकमेव भारतीय गव्हर्नर-जनरल चक्रवर्ती राजगोपालाचारी यांचा अर्धपुतळा (bust) बसवण्यात आला आहे.
• अनावरण : 23 फेब्रुवारी 2026 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या पुतळ्याचे अनावरण केले.
• उद्देश : केंद्र सरकारने ही कृती 'वसाहतवादी मानसिकतेतून' (Colonial mindset) मुक्त होण्यासाठी उचललेले एक पाऊल असल्याचे म्हटले आहे.
🏛️ सर एडविन ल्युटियन्स यांबद्दल परीक्षेसाठी थोडक्यात माहिती :
• सर एडविन लुटियन्स (Sir Edwin Lutyens) एक ब्रिटिश वास्तुविशारद आणि नगर नियोजक होते.
• ज्यांनी सर हर्बर्ट बेकर यांच्या सहकार्याने नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवन, नॉर्थ ब्लॉक, साउथ ब्लॉक आणि इंडिया गेट यांसारख्या अनेक भव्य इमारतींची रचना केली.
• त्यांच्या वास्तुकलेतील योगदानाच्या सन्मानार्थ नवी दिल्लीचा एक भाग 'ल्युटियन्सची दिल्ली' म्हणून ओळखला जातो.
🤔 चक्रवर्ति राजगोपालाचारी यांचा जन्म केव्हा आणि कोठे झाला ?
• जन्म : चक्रवर्ति राजगोपालाचारी यांचा जन्म 10 डिसेंबर 1878 रोजी तामिळनाडू राज्यातील सालेम जिल्ह्यातील थोरापल्ली येथे झाला.
• पुढे ते “राजाजी” या नावाने संपूर्ण देशात ओळखले जाऊ लागले.

📖 प्रारंभिक जीवन, शिक्षण व व्यावसायिक वाटचाल :
• राजगोपालाचारी यांनी होसूर, बेंगळुरू आणि प्रेसिडेन्सी कॉलेज, मद्रास येथे शिक्षण घेतले.
• शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी सालेम येथे फौजदारी वकील म्हणून यशस्वी कारकीर्द सुरू केली.
• मात्र देशातील राजकीय परिस्थिती पाहता त्यांनी सार्वजनिक जीवनात प्रवेश केला.
• 1917 साली ते सालेम नगरपालिकेचे अध्यक्ष झाले आणि येथूनच त्यांच्या सार्वजनिक व राजकीय कारकिर्दीला खरी सुरुवात झाली.
✍️ स्वातंत्र्य चळवळीतले योगदान :
रौलेट सत्याग्रह (1919): 1919 मधील रॉलेट सत्याग्रहात त्यांनी मद्रास प्रांतात नेतृत्व केले.
• मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने केली; मरीना बीचवर मोठ्या सभांना संबोधित केले.
असहकार चळवळ : आपली आपली चालू वकिली ची नोकरी सोडून ब्रिटीश राजवटीविरुद्ध तमिळनाडूला संघटित केले.
खिलाफत चळवळ : खिलाफत समित्या आणि प्रांतीय आंदोलनांना सक्रियपणे पाठिंबा दिला.
🌊 तामिळनाडूमध्ये झालेल्या वेदारण्यम मिठाच्या सत्याग्रह आंदोलनाचे नेतृत्व कोणी केले ?
• सी राजगोपालाचारी यांनी तामिळनाडूमध्ये मिठाच्या सत्याग्रह आंदोलनाचे नेतृत्व केले.
• महात्मा गांधींच्या दांडी यात्रेपासून प्रेरित होऊन, सी राजगोपालाचारी यांनी एप्रिल 1930 मध्ये तामिळनाडूमध्ये वेदारण्यम मिठाचा सत्याग्रह सुरू केला.
• सी राजगोपालाचारी यांनी 13 एप्रिल रोजी तिरुचिरापल्ली (Trichirappalli) येथून आपला मोर्चा सुरू केला आणि 28 एप्रिल रोजी वेदारण्यम (Vedaranyam) येथे पोहोचले.
• ज्याचा उद्देश ब्रिटिश मिठावरील कराचा निषेध करणे आणि खादी व सामाजिक विषमतेबद्दल जागरूकता पसरवणे हा होता.
• यातून 'दांडी यात्रे'च्या मिठाच्या सत्याग्रहाला दक्षिण भारतातही बळ मिळाले.
✍️ सी. राजगोपालाचारी यांचे 'माझ्या विवेकाचे रक्षक' असे कोणी वर्णन केले ?
Who described C. Rajagopalachari as 'the keeper of my conscience'?
• महात्मा गांधीजींनी सी. राजगोपालाचारी यांना “माझ्या अंतःकरणाचा रक्षक” ('The Keeper of my Conscience') असे संबोधले होते.
• सी. राजगोपालाचारी हे महात्मा गांधींच्या अत्यंत जवळच्या सहकाऱ्यांपैकी एक होते.
• महात्मा गांधींनी पुरस्कारलेल्या खादीचा प्रसार, जातीय ऐक्य, राष्ट्रीय शिक्षण आणि अस्पृश्यतानिवारण या चतुःसूत्रीचा त्यांनी आयुष्यभर प्रसार-प्रचार केला.
🏛️ सी. राजगोपालाचारी यांनी भूषविलेली स्वातंत्र्यानंतरची महत्त्वाची पदे :
• 1947–48 : पश्चिम बंगालचे राज्यपाल
• 1948–50 : भारताचे गव्हर्नर-जनरल (भारताचे शेवटचे गव्हर्नर-जनरल)
• 1950 : केंद्रीय गृहमंत्री (सरदार वल्लभभाई पटेलांनंतर)
• 1952–54 : मद्रास राज्याचे मुख्यमंत्री
✍️ सी. राजगोपालाचारी महत्त्वाची ओळख (Short Notes) :
• भारताचे एकमेव भारतीय व शेवटचे गव्हर्नर-जनरल
• वेदारण्याम मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व
• स्वतंत्र पक्षाचे संस्थापक (Founder of the Swatantra Party)
• साधेपणा, प्रामाणिकपणा व तर्कशुद्ध विचारांसाठी प्रसिद्ध
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स :
• 23 फेब्रुवारी 2026 – राष्ट्रपती भवनात चक्रवर्ती राजगोपालाचारी यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण
• अनावरण करणारे – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
• कोणाचा पुतळा हटवला ? – एडविन ल्युटियन्स (ब्रिटिश वास्तुविशारद)
• नवीन पुतळा – चक्रवर्ती राजगोपालाचारी (C. Rajagopalachari)
• ओळख – स्वतंत्र भारताचे पहिले व एकमेव भारतीय गव्हर्नर-जनरल







